I,MeMyself

I,MeMyself

Wednesday, July 25, 2012

कारगीलचे युद्ध २६ जुलै १९९९

शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बके निशाँ होगा !!!


कारगीलचे युद्ध २६ जुलै १९९९
कारगीलचे युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.१९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होतेया युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगील व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिलीत्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणताततसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धातयुद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हतीउलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता
पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले.१९९९ च्या उन्हाळ्यातपाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगीलचे युद्ध सुरू झालेही ठाणी कारगील व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होतीअनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले. 
हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहेयात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळालाहे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होतेपरंतु भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवलेत्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले
म्हणूनचभारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलटसैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणलाया युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केलीतर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली.परिणामीकाही महिन्यांतच (ऑक्टोबर.१९९९ मध्येपाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली. 
स्थळ
 .१९७१ च्या युद्धानंतर भारत व पाकिस्तानमध्ये थेट मोठे युद्ध झाले नाहीतरी सातत्याने छोट्या छोट्या चकमकी होत आहेत.सियाचीन हिमनदी वर भारतीयांचे नियंत्रण तसेच सभोवतालचा परिसरावर नियंत्रण मिळवण्यात दोन्ही बाजू सातत्याने प्रयत्‍नशील असतात.१९८० च्या सुमारास पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी पंजाबात खलिस्तानच्या नावावर दंगा घातला तसेच इ.१९९० च्या सुमारास काश्मीरमध्ये दहशतवादाने मूळ धरले परिणामी भारताने काश्मीरमध्ये कायमस्वरूपी सैन्य तैनात केले
हे दहशतवादी सुरुवातीच्या काळात काश्मीरमधील असत व त्यांना प्रशिक्षित करून पाठवले जात असेकाही काळानंतर पाकिस्तानी सैनिक,अधिकारी व तालिबानी अफगाणिस्तानातील भाडोत्री अतिरेक्यांनाही काश्मीरमध्ये पाठवले जाऊ लागलेपाकिस्तानने नेहमीच या बाबतीत आपला सहभाग असल्याचा इन्कार केलाकारगीच्या युद्धातदेखील पाकिस्तानने हीच खेळी वापरली व घुसखोर हे काश्मिरी स्वातंत्र्यसैनिक आहेत असे जगाला सांगण्याचा प्रयत्‍न केला.१९९८ मध्ये भारत पाकिस्तानने अणु चाचण्या केल्यानंतर दोन्ही देशातील संबंध चांगलेच ताणले गेलेपरंतु वाजपेयी यांनी मैत्रीचा हात पुढे करून संबंध निवळण्याचा प्रयत्‍न केला व त्यासाठी ते स्वतलाहोरला जाऊन आले होते
.१९९८-९९ च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आलेया कारवाईला ऑपरेशन बद्र असे नाव देण्यात आले व कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. (वर नमूद केल्याप्रमाणे हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळे सैन्य माघारी घेतले गेले होते.) नियंत्रण रेषेच्या जास्तीत जास्त आत घुसखोरी करून राष्ट्रीय महामार्ग १ च्या जवळ यायचेअसे केले कीमहामार्गावर कायमस्वरूपी ताबा मिळवता येईल आणि नंतर राजकीय वजन वापरून काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे पाकिस्तानला सोपे पडेल असा हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता
भारताला नवीन नियंत्रण रेषा मान्य करायला भाग पाडले कीलडाख व सियाचीनला भारतापासून तोडणे सोपे जाईल असा पाकिस्तानी युद्धनीतिज्ञांचा कयास होतातसेच घुसखोरीदरम्यान कारगील/काश्मीर परिसरात अंतर्गंत बंडखोरी भडकावून भारताला अजून बुचकळ्यात पाडण्याचा पाकिस्तानी व्यूह होताभारतीयांनी सियाचीन हिमनदीवर नियंत्रण मिळवण्यात जी क्‍ऌप्ती वापरली तसाच काहीसा प्रकार पाकिस्तानने केला असा काही लेखकांचा सूर होता
घटनाक्रम
 
पाकिस्तानी घुसखोरांचा भारतीय चौक्यांवर कब्जा
 
कडक हिवाळ्यातील महिन्यांमध्ये मनुष्यहानी कमी व्हावी म्हणूनअतिउंचावरील चौक्या रिकाम्या करायचा प्रघात भारत व पाकिस्तान हे दोघेही पाळतहवामान पुन्हा ठीकठाक झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतून संरक्षणाची जवाबदारी घेत असे.
फेब्रुवारी.१९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभलेपाकिस्तानने ही कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या व थांगपत्ता लागू न देता पार पाडलीयांतच भर म्हणजेभारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची माहिती अजिबात मिळाली नाही त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र भारतातून व जगातूनही चांगलीच टीका झाली
स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्यातसेच नॉर्दर्न लाइट इन्फट्रीच्या ४ ते ७ बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्यारिकाम्या चौक्यांव्यतिरिक्त भारतीय सैन्याला हल्ला करायला अवघड जावे म्हणून मोक्याच्या जागाही ताब्यात घेण्यात आल्यासाधारणपणे,अतिउंचावरील एक मुख्य चौकी व त्याला टेका देणार्‍या दुय्यम उतारावरील व कमी उंचीवरील चौक्या ताब्यात घेण्यात आल्यापाकिस्तानी मुख्य सैनिकांबरोबरच अफगाणी मुजाहिदीनकाश्मिरी मुजाहिदीन यांनाही या कार्यवाहीत समाविष्ट केले गेले.
भारतीयांना उशीराने मिळालेली खबर

सुरुवातीलाअनेक कारणांमुळे कारगीलची घुसखोरीचा पत्ता लागण्यास उशीर झालामुख्यत्वे पाकिस्तानने अनेक भागात तोफांचा मारा केल्यामुळे शोधपथक पाठवण्यास दिरंगाई झालीभारतीय लष्कराच्या मतेहा तोफखान्याचा मारा नेहेमीचा असतोत्यात नवे काही नाही.पाकिस्तानने हा मारा नियंत्रण रेषेपलीकडील सैनिकांना/घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी केलामेच्या दुसऱ्या आठवड्यात स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली
त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी तुकडी पाठवलीतिच्यावर हल्ला करण्यात आला व घुसखोरी झाल्याचे सिद्ध झालेसुरुवातीला ही मुजाहिदीन स्वरूपाची भासल्याने घुसखोरी लवकरच संपवता येईल असे वाटलेपरंतु लगेचच नियंत्रण रेषेच्या बऱ्याच लांबीवर ही घुसखोरी झाल्याचे लक्षात आलेघुसखोरांकडून आलेले प्रत्युत्तर वेगळ्याच प्रकारचे होते व वरवर घुसखोरी वाटणारी घटना मोठ्या नियोजनाचा भाग आहे असे लक्षात आलेअशा रितीने कारगील येथे युद्ध सुरू झाले आहे यावर शिक्कामोर्तब झालेपाकिस्तानने एकूण सुमारे १३० ते २०० चौरस किलोमीटर प्रदेश ताब्यात घेतला होतातर मुशर्रफ यांच्या मते १३०० चौरस किलोमीटर इतका प्रदेश ताब्यात घेण्यात आला होता.
भारतीय सरकारने 'ऑपरेशन विजयया नावाखाली कारगीलच्या युद्धासाठी कार्यवाही चालू केलीत्यासाठी संख्येने मुळात सुमारे २,००,००० इतक्या फौजेचा आधार घेण्यात आलापरंतु भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर युद्ध करणे शक्य नव्हतेत्यामुळे रेजिमेंटल व बटालियन पुरतीच कारवाई शक्य होतीअर्थातच फौजेची गणसंख्या २०,००० पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली.. अर्धसैनिक व वायुदल मिळून भारताने एकूण ३०,००० पर्यंत सैनिक कारगीलच्या युद्धात वापरलेघुसखोरांची संख्या पाकिस्तानी सूत्रांप्रमाणे साधारणपणे ५,००० होतीयांत पाकव्याप्त काश्मीरमधील तोफखान्यामधील सैनिकही समाविष्ट होते.
भारतीय वायुसेनेकडूनही 'ऑपरेशन सफेद सागरसुरू झालेया ऑपरेशनाद्वारे पायदळ सैन्याची ने-आण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने निभावलीमोठे बॉम्ब वाहून नेण्यासाठी लागणारे मोठे विमानतळभौगोलिक परिस्थितीमुळे या भागात नसल्याने इथेही वायुसेनेचीही व्याप्ती मर्यादित होती.
भारतीय नौदलानेही पाकिस्तानी बंदरांना आपले लक्ष्य केले व त्यामध्ये येणाऱ्या जहाजांची कोंडी केलीकराची बंदर हे खासकरून लक्ष्य करण्यात आलेया कृत्याने पाकिस्तानला आवश्यक अशा जीवनावश्यक वस्तूंची रसद थांबवली गेलीकाही काळाने नवाज शरीफ यांनी उलगडवून सांगितले की पाकिस्तानकडे या काळात फक्त ६ दिवसांचाच इंधन साठा राहिला होता व जर पूर्ण युद्ध सुरू झाले असते तर पाकिस्तानची बरीच नाचक्की झाली असती.
भारतीय प्रत्युत्तर

कारगीलचे युद्ध सुरू झाल्यानंतर केवळ रसद तोडण्यासाठी पाकिस्तानचा श्रीनगर-लेह मार्ग कापून काढायचा इरादा आहे हे नक्की झाले.भारताने सैन्य जमवाजमवीचे प्रयत्‍न सुरू केल्यानंतर पाकिस्तानकडून श्रीनगर-लेह मार्गावर मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा करण्यात आलाप्रत्युत्तरादाखल भारताकडून श्रीनगर-लेह या राष्ट्रीय महामार्गाच्या जवळचा भाग ताब्यात घेण्यास जास्त महत्त्व देण्यात आलेअसे केले की हा महामार्ग सुकर होणार होता.
घुसखोरांनीआधुनिक शस्त्रास्त्रांनी चौक्या सुरक्षित केल्या होत्याबंदुकास्वयंचलित मशीन गनछोट्या उखळी तोफा व विमानभेदी क्षेपणास्त्रे यांनी चौक्या सज्ज होत्यातसेचचौक्यांचा सभोवतालचा परिसर पेरलेल्या सुरुंगांनी संरक्षित केला होतायातील ८,००० सुरुंग भारतीय सेनेने युद्ध संपल्यावर निकामी केलेया चौक्यांना पाठीमागून पाकिस्तानी हद्दीतून मोठ्या प्रमाणावर तोफखान्याचे संरक्षण मिळाले होते
पाकिस्तानने या युद्धाआधी त्या परिसराची चालकरहित विमानांमधून टेहळणीदेखील केली होतीवर नमूद केल्याप्रमाणे भारतातर्फे आधी महामार्गलगतच्या चौक्यांवर हल्ले करण्यात आलेहा मारा बहुतांश कारगीलच्या जवळच्या भागावर केंद्रित करण्यात आलाया चौक्यांवर ताबा मिळाल्याने भारताने काबीज केलेल्या जागेत भर पडली व महामार्गही सुरक्षित होत गेलाजसा महामार्ग सुरक्षित होत गेला तसे पुढील हल्ल्यांचे नियोजन सूत्रबद्ध रितीने होत गेले.
महामार्गाच्या जवळच्या चौक्यांवरील भारतीय आक्रमणांत टायगर हिल व तोलोलिंग शिखर या दोन चौकीवजा शिखरांवरील आक्रमणे नोंद घेण्याजोगी होतीयानंतर बटालिक व तुर्तुक या सियाचीन लगतच्या भागाला लक्ष्य करण्यात आलेयातील काही जागा गमावणे पाकिस्तानी संरक्षणाच्या दृष्टीने परवडणारे नव्हतेपॉईंट ४५९० व पॉइंट ५३५३ या त्यापैकी काही महत्त्वाच्या जागा होत्या. (या भागात शिखरांना नावे त्यांच्या उंचीप्रमाणे असतात). 
४५९० हा महामार्गाला सर्वात जवळचा पॉइंट होता तर ५३५३ हे युद्धातील सर्वात अधिक उंचीचे शिखर होतेपॉइंट ४५९० वर १४ जून १९९९ रोजी भारतीय सेनेने ताबा मिळवला व युद्धाचे पारडे हळूहळू भारताच्या बाजूने झुकू लागलेयाच शिखराच्या ताब्यासाठी भारतीय सेनेला सर्वाधिक मनुष्यहानी सोसावी लागलीजरी भारतीय सेनेने जूनच्या मध्यापर्यंत महामार्गासाठी महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेण्यात यश मिळवले असले तरी पाकिस्तानी बाजूने युद्धाच्या अंतापर्यंततोफखान्याचा भडिमार चालूच होता.
भारताने जेव्हा महामार्गालगतच्या महत्त्वाच्या चौक्यांवर ताबा मिळवला तेव्हा भारतीय सैन्याने घुसखोरांना नियंत्रण रेषेपलीकडे पिटाळायचे धोरण आखलेतोलोलिंगची लढाई व टायगर हिलची लढाई ही या युद्धातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जातेअनेक शूर भारतीय अधिकारी व सैनिक या लढायांमध्ये मरण पावलेतोलोलिंगच्या लढाईनंतर सामरिक तसेच राजनैतिकही पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले
टायगर हिलवर उशीरा नियंत्रण मिळवले गेले तरी ती सर्वात महत्त्वाची लढाई होती असे मानतातटायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्‍न झालेपाकिस्ताननेही खंदक वगैरे खोदून भारतीय सैनिकांना चांगलेच झुंजावयाला लावलेसरतेशेवटी ४ जुलै रोजी टायगर हिल भारताच्या ताब्यात आलीया लढाईत भारताचे ५ सैनिक व पाकिस्तानचे १० सैनिक म्रुत्यूमुखी पडल्याचे कळते.
या युद्धात भारतीय सैन्याने नवनवीन क्‍ऌप्त्यांचा चांगलाच वापर केलाकाही लढायांमध्ये भारतीय सैनिकांनी रात्रीच्या अंधारात हजारो फूट सरळसोट कड्यांवर गिर्यारोहण करून शत्रूवर अनपेक्षित ठिकाणांवरुन हल्ले चढवले व चौक्या ताब्यात घेतल्याकाही ठिकाणी भारतीय सैन्यातील काही मुसलमान तुकड्यांनी आक्रमण करताना अल्ला हू अकबर असा नारा देत हल्ला केला त्यामुळे शत्रूपक्ष आपलेच सैनिक आहेत या भ्रमात राहिले व चौक्या गमवाव्या लागल्या
बहुतांशी चौक्या या खूप उंचीवर होत्या व काश्मीरमधील हा भाग दगडी व रेताड आहे त्यामुळे लपायची फारशी जागा उपलब्ध नव्हती.त्यासाठी भारतीय सैन्याने मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून बहुतेक हालचाल रात्रीच्या वेळेसच करण्याचे धोरण आखले होतेपरंतु रात्रीच्या हालचाली ह्या वेळखाऊ होत्यातसेच या उंचीवरील अतिशय कमी तापमान व जबरदस्त उतारावरील लढाया ह्या सर्वच गोष्टी भारताच्या विरोधात होत्या
या भागात सर्व चौक्यांना वेढा देऊन घुसखोरांचा रसद पुरवठा तोडून कमी जोखमीचे चे युद्ध करणे भारताला शक्य होते तसेच पूर्णपणे हवाई हल्ले चढवून घुसखोरांच्या ताब्यातील चौक्या मिळवणेही शक्य होतेपरंतु या साठी भारताला नियंत्रण रेषेपलीकडचा भाग मिळवणे आवश्यक होतेजर तसे केल्यास पूर्ण युद्ध होण्याची शक्यता होती व भारत सरकार यासाठी तयार नव्हतेजर असे झाल्यास या युद्धात मिळालेली आंतराष्ट्रीय सहानूभूती भारत गमावेल अशी त्यांना भीती होती.
भारताने इ.१९९९ सालच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या लढाया केल्या व अनेक जागा ताब्यात मिळवल्या
पाकिस्तानची
 दगाबाजी 
सुरूच आहे७१च्या युद्धात भारताच्या बहाद्दर सैनिकांनी पाकिस्तानचा दारुण पराभव केलापाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसह ९३ हजार सैनिकांनीहिंदुस्थानसमोर गुडघे टेकून शरणागती पत्करलीत्यावेळी पाकिस्तानच्या विनंतीनुसार हिंदुस्थानच्या ‘दयाळू सरकारने तत्काळ सर्व पाकिस्तानीसैनिकांची सुटका केलीपण याच युद्धाच्या वेळी पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या केवळ ५४ हिंदुस्थानी युद्धकैद्यांना मात्र पाकिस्तानने सोडलेनाही. ‘शांती का पैगाम म्हणून फेब्रुवारी १९९९ मध्ये हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानात जाऊन ‘लाहोर करार केलात्यानंतर चारच महिन्यांनीपाकिस्तानने कारगीलचे युद्ध लादून हिंदुस्थानचे पांग फेडले. ‘शेजार्‍याचा कळवळा म्हणून लाहोर बससमझोता एक्स्प्रेस सुरू केली तेव्हा यागाड्यांतून बनावट नोटा पाठवून हिंदुस्थानची अर्थव्यवस्थाच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न पाकड्यांनी केला२००१ मध्ये आग्र्यात जनपरवेजमुशर्रफ यांच्यासोबत शिखर परिषद झाली आणि चारच महिन्यांनी पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांनी हिंदुस्थानच्या संसदेवरच हल्ला चढवला.पाकिस्तानने हिंदुस्थानशी केलेल्या दगाबाजीचा हा काळाकुट्ट इतिहास आहेमात्र त्यापासून कोणताही धडा  घेता हिंदुस्थानी राज्यकर्ते पुनपुन्हापाकिस्तानशी ‘शांतता बोलणी करण्याची भंपकबाजी करायला तयार होतातहेच देशाचे दुर्दैव आहेपाकिस्तानला शांततेची भाषा समजते असेसमजणे म्हणजे बकवास आहेपुन्हा ज्या ज्या वेळी पाकिस्तानी नेतेअधिकारी हिंदुस्थानात चर्चेसाठी येतात तेव्हा आधी कश्मीरातील फुटीरवादीनेत्यांशी चर्चा करतातहा काय प्रकार आहेहिंदुस्थान सरकारही त्यांना परवानगी कशी देतेहे सारेच गौडबंगाल आहेयावेळीही हुरीयतच्याअध्यक्षापासून यासीन मलीकपर्यंत सर्वच आगलाव्या नेत्यांशी पाकच्या परराष्ट्र सचिवांनी दोन तास चर्चा केलीपुन्हा या चर्चेत नेमके काय शिजतेहे कधीच बाहेर येत नाहीपाकिस्तानला तिथे बसून जे करता येत नाही ते आपल्या देशात येऊन करण्याची मुभा कशी काय मिळू शकते?पाकिस्तानशी चर्चा आणि बोलणी करून काहीही साध्य होत नाहीहे आजपर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहेउलट अशा प्रत्येक चर्चेनंतर पाकिस्ताननेहिंदुस्थानात अतिरेकी हल्ले घडवून गद्दारीच केलीआता तरी हिंदुस्थानी राज्यकर्त्यांनी चर्चा आणि बोलण्यांची थेरं थांबवून पाकिस्तानला समजेलअशाच भाषेत उत्तर द्यायला हवेकारण ‘लातों के भूतबातों से नही

Wednesday, June 20, 2012

सुरक्षित ट्रेक


सुरक्षित ट्रेक


पूर्वरंग:वर्ष २००८ चा पूर्वार्ध: वासोट्याला २ ट्रेकर्सचा मृत्यु. लोहगडाजवळ एक मृतदेह आढळला.
जानेवारी २००९: तोरण्याजवळ दुर्घटनेत एका ट्रेकरचा मृत्यु.
फेब्रुवारी २००९: तोरण्यावरुन दोन तरुण बेपत्ता. चार दिवसांनी जंगलात मृतदेह सापडले.
सर्वसाधारण लोकांचे मत: ट्रेक किंवा गिर्यारोहण कायमच धोकादायक असते.
हे आतापर्यंतचे दृश्य. इथे माझा कुणाकडेही अंगुलीनिर्देश करण्याचा प्रयत्न नाही. आणि नाही कुणाला उपदेशाचे डोस पाजण्याचा. खरं तर तेव्हा माझी आई “सकाळ मुक्तपीठ”मधे आलेला तोरणा दुर्घटनेबद्दलच लेख वाचत होती आणि त्याच वेळी माझ्या वर्षभर चालणाऱ्या भटकंती आणि ट्रेक्सबद्दल तक्रारही.
अशीच काहीसे माझ्यावर मनापासून प्रेम करणारे जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी आणि हितचिंतक यांचे झाले होते. म्हणूनच हा लेख मझ्या सगळ्या कुटुंब सदस्यांना, मित्रांना आणि हितचिंतकांना समर्पित करत आहे. आधी विचार केला होता की या सगळ्यांना प्रत्यक्ष समजावून सांगावे, पण नंतर लक्षात आले की हेच विचार शब्दबद्ध केले तर माझ्यासारख्या सह्याद्रीच्या कुशीत हरवून जायला संधी शोधणाऱ्या अनेक नविन जुन्या, नवखे, अट्टल ट्रेक गुरु असणाऱ्या सह्यप्रेमींना कायम उपयोगी पडेल.
आमची ट्रेकची व्याख्या “भटकंती अनलिमिटेड” जरी असली तरी इथे “अनलिमिटेड” हा शब्द ट्रेकच्या दरम्यानची वागणूक नाही तर ट्रेकच्या नियमिततपणाबद्दल किंवा वारंवारितेबद्दल संबधित आहे. मी आणि माझी ’भटक्या टोळी’चे सदस्य (इथून पुढे एकत्रितपणे ’आम्ही’) ट्रेकची रुपरेषा आणि प्लॅनिंगबद्दल कधीच तडजोड करत नाही. त्यासाठी गुगलने नेहमीच आमचे मदत केली आहे.
एकदा की ठिकाण (शक्यतो एखादा किल्ला) निश्चित झाले की आम्ही आमच्या कामाला लागतो. त्याबद्दल जी काही माहिती मिळते तेवढी माहिती मिळवायचा प्रयत्न करतो. यामध्ये प्रवासाची साधने, पोचण्याचा रस्ता, रस्त्याची स्थिती, प्रवासाला आणि ट्रेकला लागणारा वेळ, ऋतूनिहाय असणारे पोचण्याचे मार्ग किंवा वाटा (काही वाटा पावसाळ्यात बंद होतात), खाण्याची सोय होणाऱ्या जागा, पाण्याची उपलब्धता अशा माहितीचा समावेश असतो. आमचा माहितीचा प्रमुख स्त्रोत असतो जे लोक तिथे आधी जाऊन आलेत त्यांनी लिहिलेले ब्लॉग्ज. हे ब्लॉग्ज नेहमीच अशा ठिकाणांची एकदम ’फर्स्ट हॅंड’ माहिती देतात. पुढचा कळीचा मुद्दा असतो पाणी आणि अन्नाची उपलब्धता आणि गरज असेल तर मुक्कामाची व्यवस्था. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कुठे जाणार आहोत याची पूर्ण कल्पना घरी देऊन ठेवलेली असते. ट्रेकमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या मेंबर्सचे मोबाईल नंबर घरी लिहून ठेवतो.
पॅकिंग:
पॅकिंग म्हणजे ट्रेकसाठी तयार होणे. चांगल्या उत्कृष्ट प्रतीची सॅक ही ट्रेकिंगची पहिली गरज. त्यात भरलेले सगळे साहित्य पटकन सापडावे अशी ही सॅक असावी. जर ट्रेकच्या दरम्यान मुक्कामाचा बेत असेल तर मुक्कामाची सोय आणि पुरेसे बेडिंग असणे महत्वाचे असते. जर ह मुक्काम खुल्या आकाशाखाली तारे मोजत करणार असू तर जंगली जनावरे, साप, विंचू अशा सरिसृप प्राण्यांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. जरी बेडिंग स्लीपिंग बॅगसारखे भारी नसले तरी ते परिपूर्ण असावे. बॅगमध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तू म्हणजे एक लहानसा चाकू (सेफ्टी नाइफ, आर्मी नाइफ उत्तम), टॉर्च, एक्स्ट्रा बॅटरी (सेल), काडीपेटी, मोबाईल फोन, प्रथमोपचार साहित्य, काडीपेटी, पाण्याच्या बाटल्या, हलके खाण्याचे पदार्थ, त्वरित शक्तिकारक ऊर्जा देणारे ग्लुकॉन-डी सारखे द्रव्ये, ग्लुकोजची बिस्किटे. उत्तम प्रतीचे बूट अत्यावश्यक (फ्लोटर्स नाही, प्लीज). जर पावसाळ्याचे दिवस असतील तर सगळे पॅकिंग पाणी जाणार नाही, साहित्य भिजणार नाही अशा रीतीने केलेले असावे. शक्यतो वेगवेगळ्या ऑपरेटर्सची सर्व्हिस असणारे मोबाईल असावेत (टट इंडिकॉमचे नेटवर्क थोडेफार का होईना, पण सगळीकडे मिळते असा आमचा आजवरचा अनुभव आहे. आणि ते स्वस्तही आहेत. इथे आमचा कुणाचीही जाहिरात करण्याचा उद्देश नाही).
प्रवास:
महाराष्ट्राचे गड-कोट-किल्ले हे मोठ्या शहरांपासून शक्यतो सहजासहजी पोचता येईल असे नाहीत (काही सन्माननीय अपवाद वगळता). म्हणून आम्ही त्या परिसराची आणि रस्त्याची पूर्ण माहिती काढतो. प्रवास सार्वजनिक बससेवेचा उपयोग होणार असेल तर त्याचे वेळापत्रक आधी माहीत असावे. बहुधा आमचा प्रवास स्वतःच्या बाईकवर किंवा कारने होतो. बाईक असेल तर पहिला (खरं तर नियम क्रमांक ०) असतो हेल्मेट कंपल्सरी. वेळेला आम्ही हेल्मेट नसणाऱ्या मित्रांसाठी हेल्मेट्स कुठूनतरी पैदा करतो. आणि कधी हेल्मेट नसेल तर तो मेंबर नाकारतोही. पुढची गोष्ट असते त्या ठिकाणी पोचण्याचा कमीत कमी दूरचा, चांगल्या अवस्थेतला रस्ता शोधून कढणे. प्रवासाचा प्लॅन असा आखतो की रात्री गाडी चालवायला लागू नये. रस्ताच्या स्थितीचा अंदाज घेऊन तिथे पोचण्याच्या वेळेचे गणित मांडणे पण महत्वाचे. गाडीत पेट्रोलची पातळी, टायरमध्ये योग्य हवा या गोष्टी आधीच चेक केल्या जातात. विशेषतः टायरच्या ट्रेड्समध्ये फसलेले खडे आणि इतर गोष्टी कढून टाकतो, कारण याच गोष्टी नंतर गाडी पंक्चर होण्यास कारणीभूत ठरतात. आम्ही आमच्या आमच्यात किंवा रस्त्यावरील इतर गाड्यांशी कधीही स्पर्धा करत नाही. प्रत्येक वेळी मागे बसणारा मित्र गाडी चालवणाऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवून असतो आणि अतिवेग किंवा जास्त आगाऊपणाबद्दल सावधान करत असतो. तसेच ओव्हरटेक करताना मागून येणारी वाहने सुरक्षित अंतरावर आहेत आणि ओव्हरटेक सुरक्षितपणे होईल यावर लक्ष ठेवून असतात. कारण आरशात पाहून मागून येणाऱ्या गाडीचा अंदाज येणे अवघड असते. गाडी चालवताना सगळे इशारे (इंडिकेटर्स, हाताचे इशारे) व्यवस्थित दिले जातात. आम्ही नेहमीच वाहतुकीचे नियम पाळतो, नव्हे आम्हाला त्याचा अभिमान आहे.
प्रत्यक्ष ट्रेक:
आम्ही जेव्हा पायथ्याला पोचतो तेव्हा पुन्हा एकदा खाली गावात वरपर्यंत पोचण्याचा रस्ता विचारून घेतो. स्थानिक लोकांशी नेहमी सलोख्याचे संबंध ठेवतो, कारण वेळ पडली तर कठीण प्रसंगी तेच आपल्याला मदत करणार असतात. मावशी, ताई, भाऊ, काका, मामा असे सगळे शब्द त्यावेळी उपयोगी पडतात. त्यांच्याकडे असणाऱ्या महितीबद्दल त्यांना अभिमान वाटेल असेच वर्तन आम्ही राखतो. प्रत्यक्ष चढाई करताना सावकाश पण स्थिर वेग राखणे आवश्यक असते. वेळोवेळी मागे वळून पाहून काही खुणा लक्षात ठेवतो. म्हणजे त्या खुणा परत येताना किंवा वाट चुकली तर बॅकट्रॅकिंग करताना उपयोगी पडतात. जर मोबाईलला कव्हरेज नसेल तर आम्ही तो ऑफलाईन किंवा बंद ठेवतो, कारण नेटवर्क शोधत राहणारा फोन जास्त बॅटरी खातो. शक्यतो आम्ही मोबाईलवर गाणी ऐकत नाही. कारण हिप-हॉप आणि धूमधडामपेक्षा भन्नाट रानवारा आणि वादळाचे ढोल जास्त इंटरेस्टिंग असतात. आणि ते बॅटरीपण वाचवतात. आम्ही अगदी अशक्य जागांवर पोचण्याचा कधीही प्रयत्न करत नाही किंवा तसे करण्यास कुणाला आव्हान देऊन उद्युक्त करत नाही. उलटपक्षी जर एखादी जागा थोडीसुद्धा धोकादायक असेल तर सगळ्यांना तिकडे जाण्यापासून परावृत्त करतो. अतिउत्साही मित्रांना परवृत्त करण्यासाठी साम, दंड, भेद (दाम नसतो) अशा सर्व मार्गांचा अवलंब करतो. पण शेवटी ट्रेकमधे धाडस, साहस आणि कॅल्क्युलेटेड रिस्क अशा गोष्टी अनिवार्य असतात. मग असे काही प्रयत्न करण्याजोगे असतील तर ग्रुप लीडर इतरांच्या मदतीने आधी करतो आणि मग इतरांना तिथे पोचायला मदत करतो. सर्वजण ट्रेकला एक टीम म्हणून गेलो होतो आणि एक टीम म्हणूनच ट्रेक पूर्ण करायचा असतो. वेगवेगळ्या ऋतुंध्ये एकच ट्रेक वेगवेगळा असू शकतो. पावसाळ्यात एखाद्या ट्रेकमधे खडक शेवाळलेले असु शकतात आणि हिवाळ्यानंतर गवत-झुडुपांचे कमजोर आधार नवी आव्हाने उभी करू शकतात. या गोष्टी कायम लक्षात ठेवाव्या लागतात. आम्ही रांगड्या सह्याद्रीचे आणि निसर्गाचे प्रत्येक पैलू मनापासून एंजॉय करतो, पण त्याला कधीही आव्हान देत नाही. काही श्वास रोखून धरायला लावणाऱ्या कड्यांवरुन खाली पाहताना पोटावर झोपून पाहणे किंवा खाली झुकून दबकत चालणे हितावह असते, कारण त्यामुळे आपला गुरुत्वमध्य जमिनीपासून कमीत कमी उंचीवर राहतो आणि तोल सहजासहजी जात नाही. दरीच्या कडेवर किंवा उंच कड्यावर कधीही सरळ विना-आधार उभे राहू नये कारण डोळे गरगरल्यामुळे किंवा वेगवान वाऱ्यामुळे तोल जाण्याचा धोका संभवतो.
रात्रीचा मुक्काम:
पुरेसे बेडिंग असणे महत्वाचे आहे. सूर्यास्त होण्यापूर्वी आम्ही मुक्कामाची जागा गाठतो आणि ती जागा साफ करून घेतो. त्यामुळे साप किंवा इतर कीटकांचा धोका दिवसाउजेडीच ओळखू येतो. एक काठी नेहमी बरोबर ठेवतो. नसेल तर तिथे पोचल्यावर शोधतो. अंधारात कधीही एकटे बाहेर पडत नाही. ३-४ च्या गटाने एकत्र बाहेर पडून बरोबर टॉर्च आणि काठी घेऊन जातो. मुक्कामाच्या जागी (कँपसाईटवर) नेहमी रात्री आग पेटवून ठेवतो. नशिबाने माझ्या भटक्या टोळीच्या एकाही सदस्याला हरवून जाण्यासाठी किंवा ’ट्रान्स’ मिळवण्यासाठी मद्याची गरज पडत नाही. सह्याद्रीचा गुणच असा आहे की आपोआपच तुम्हांला एक वेगळी नशा चढते.
पाण्यासंबंधी:
बऱ्याच किल्ल्यांवर पाण्याचे टाके किंवा विहीर असते. ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही ते आधी पाहून घ्यावे. अधिक दक्षता म्हणून ते पाणी उकळून घ्यावे किंवा लिक्वीड क्लोरीन वापरावे. त्या पाण्यामध्ये पोहणे टाळावे कारण आपल्यानंतर दुसरेही कुणी पाणी पिणार असते आणि शिवाय त्यात लपलेले साप, पाणकीटक असे धोके असू शकतात. खाले गाळात रुतून बसण्याचा आणि अतिखोल पाणी असण्याचाही धोका नाकारता येत नाही. जर समुद्राचे पाणे असेल तर त्या गावातील स्थानिक लोकांना विचारून भरती-ओहोटीच्या वेळेची पूर्ण माहिती करुन घ्यावी. समुद्रात पोहणे शक्यतो टाळावेच. किनाऱ्यावर लावलेले धोकादर्शक बावटे आणि त्याचे अर्थ समजून घेऊन पाण्यात खेळावे.
मुक्कामानंतर:
कॅंपसाईट स्वच्छ करावी. आपले सगळे प्लॅस्टिक शहरात घेऊन यावे. आम्ही जैविक विघटण होणारा कचऱ्याची मात्र तिथे एका कोपऱ्यात विल्हेवाट लावतो हे सरळ सरळ कबूल करतो. ते ठिकाण पूर्वस्थितीत आणण्याचा शक्य होईल तेवढा प्रयत्न करतो. शक्यतो पेटवलेल्या आगीच्या राखेशिवाय मागे काहीही ठेवू नये. तिथली जैविक साखळी आणि पर्यावरणाला हानी पोचेल असे काहीही टाकू नये.
उत्तररंग:
ट्रेक्स हे थ्रिलिंग असतात. आपल्याला ताजेतवाने करतात. पण सुरक्षितपणे डोळे उघडे ठेवून केले तरच. सुरक्षित रहा, आणि इतरांना त्यासाठी प्रोत्साहन द्या. सुरक्षित आणि स्वच्छ ट्रेकबद्दल जागृती करा. नवी आव्हाने स्वीकारा, पण निसर्गाला आव्हान देऊ नका. निसर्गावर प्रेम करा, त्याची पूजा करा. सह्याद्री आपली शान आणि मानबिंदू आहे, त्याला जपा.
मला खात्री आहे की हे सगळे वाचल्यानंतर ट्रेक्स थंबणार नाहीत तर, नवीन ट्रेकचे प्लॅन्स आणखी जोमाने होतील. आपले मित्र, परिवारजन आणि हितचिंतक आपल्यावर असेच प्रेम करत राहतील. आपणही करा.
ता.क. : हा लेख बऱ्याच जणांन उपयोगी ठरू शकतो. तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. न जाणो यामुळे तरी सुरक्षित ट्रेक बद्दल प्रसार होईल. काही मुद्दे विसरलो असेन तर जरूर कळवा.
हे दुर्गलंकृत सह्याद्री, मी लवकरच पुन्हा येईन…!!!



Pankaj Zarekar

Tuesday, May 1, 2012

जरा आयुष्य जागून पाहू .......


जरा  आयुष्य  जागून  पाहू .......


फावला  वेळ  नुसता काय कराव काळात नाही 
वेळ  जातोय  तरी  कामाकडे  मन  वळत  नाही 
कितीहि  प्रयत्न केला तरी गोल  फार लांबच  राहत
नुसताच  ठरवून  सर काही होत  तिथेच  पडू  पाहत

कंपनी  माझी लय  भारी 
हुशार  लोकन्ची  गर्दी  सारी 
हाईक  नसून पण  काम  फार 
माझ्या  मनाचा  झाला  विचार 
स्वीच  चा  विचार  करताच  रीसेसन  आठवल
जोब  बदलण्याचा  खूळ  तिकडेच  माघारी  पाठवल..

प्रोफ़ेसनाल  बनता  बनता  पेर्सनल   लाइफ  गमावली 
मेकानिकॅल   इंन्जीनियर   ने   आयटी  ची  समाप्ती  कमावली 
स्वप्न  होती  खूप  मोठी  पण  यात  सारी  वाहून  गेली ...
पैशानाच्या  गरजे  पुडे  सारेच  राहून गेले .....

अंग  जरी  शाबूत  असला  डोक  आमचा  थकून  जात 
स्टेटस  उपदेत  च्या  काल  मध्ये  शांत  सणाची  वाट  पाहत
एक  मीटिंग  झाली  कि दुसरीची  करावी लागते तयारी ..
अजेंडा  आणि  प्रेसेनटेशन   च्या  गोंधळात  
मन थोडीशी  विश्रांती  मागत...


बॉस  नावाचा  बटण  सांभाळताना  आयुष्याची  नाडी तुटून  जाते ..
बँक  बलेनस च्या  नावाखाली  आयुष्याची  गाडी सुटून जाते ..
आयुष्याच्या  प्रगती  बरोबर  भावना  पण   खूप   महत्वाची   असते  
आपल्या   प्रेमळ  माणसां पेक्षा  अचैवेमेंट  महत्वाची  नसते ...

खूप झाल  काम  आता  ... जरा  आयुष्य  जागून  पाहू ..
5.30 ची  जरी सुटली कमीत कमी  6.00 च्या बस  ने  तरी घरी  जावू....


कवी 

समाधान  घोलप .......