I,MeMyself

I,MeMyself

Saturday, April 28, 2012

मुंबई - मंग्लोरे - मालवण - मुंबई 31st 2011

मुंबई - मंगलोर - मालवण - मुंबई 31st  2011

हा  प्लान  खरतर समाधान चा होता . त्याने मला विचारला आणि मी लगेच हो म्हंटला कारण त्याच्या बरोबर वेळ घालवायला आवडतो मला.

प्लान ठरला मग मी ठरवला कि आपण मंगलोरला जावू आणि मग तिथून मालवण.मी ट्रेनचा बुकिंग पाहू लागलो पण साला सगळा फुल.मला रात्रीच प्रवास आवडतो आणि पहिल्यांदा महाराष्ट्र बाहेर जाणार म्हणून मग मजा आल्यासारखा १५०० ला व्ल्वो ची बुकिंग केली.

पहिला दिवस : - 

ऑफिस मध्ये का कोण जाणे त्या दिवशी खूप काम होते.पण मी निघालो ५.०० ला.ऑफिस मधून परस्पर  जाणार म्हणून बाग ऑफिस मधेच आणली होती.ऑफिस च्या कपड्यावरच निघालो.काका (समाधान चे वडील ) सोडायला येणार होते पण बरे झाला नाही आले.कारण मला गाडी लगेच मिळाली जराशी चुका मूक झाली असती तरी त्यांचा काही उपयोग झाला नसता येवून.माझे वडील सुधा येणार होते पण मीच नको म्हणालो.

आज पर्यंत  वोलवो  फक्त बाहेरूनच पाहिलेली.१० वेळा तिकीट वरचा  गाडी चा न. पहिला.दोन दाबेल्या खालालय पण नेहमी प्रमाणे पाणी घायला विसरलो.समाधान ला फोने केला तेव्हाच गाडी आली होती.गाडीत बसलो तोचा माझ्या दीदी चा messege  आला "सगळा बरो बर घे .स्वेटर घेतला का . ......etc " आई नंतर काळजी करणारी माझी लाडकी बहिण.स्तीर्स्तावर झालो आणि मग घरी फोने केला.आपी ला फोन केला . तिला नुकताच हॉस्पिटल मधून आणला होता.ऐर्टेल चा साला त्याचा दिवशी प्रोब्लेम झाला होता  फोन लागत नव्हते.

गाडीत बसलो तर बाजूला मुलगा साला तो पण southindian मग काय बाहेर बघत राहिलो तशी पण माझी विंडोव seat होती.मी शक्यतो प्रवासात कोणाशी बोलत नाही कारण जर समोरचा पकाव निघाला तर वाट लागते.मी पाहत बसतो आजूबाजूला कोण कोण काय काय करतं ते त्यातच मजा येते.समाधान्शी संपर्कात होतो.पण साला मला घ्यायला येणार नव्हता तो.गाडी सकाळी कर्नाटकात होती.मंग्लोरे आला.समाधान चा मित्र आला होता .मला तो पोरगा मस्त वाटला भैया भैया म्हणून बोलायाचा.त्याला वाटला कि मी समाधानचा मोठा भाऊ आहे ( तसा मी मोठा आहेच.) "राहील" हे त्याचा नाव.मग तो आणि मी घरी आलो.फ्रेश होवून जेवायला बाहेर गेलो.समाधान येई पर्यंत सगळे mall पालथे घातले.नेहमी प्रमाणे समाधान उशिरा आला.त्याला  तशा मी फोने करून शिव्या पण घातल्या.पण सल्याने दुसर्या दिवशी सुट्टी टाकली होती त्यामुळे वाचला.  


राहील भाई 




१) सुलतान बतेरी :

हो नाही करता करता ७-८ जन गेलो.मंग्लोरे मधला एक मस्त समुद्र किनारा.नदी पार करावी लागते फैरी ने.आम्ही गेलो तेव्हा सूर्य मावळत होता.तेथे पोहोचलो तेव्हा काळोखाच एकदम.थोडे फोटो काढून परत फिरलो.

गुलाबी गुलाबी 




मी आणि समा...

मी आणि राहील


२) मंदिर

सुलतान बतेरी वरून समाधान च्या नेहमीच्या ठिकाणी गेलो मंदिर.समाधान नेहमी ह्या मंदिरात येतो.खरतर मंग्लोरे मध्ये मंदिर भरपूर आहेत त्यातलाच हे एक अतिशय सुंदर मंदिर.मी,समा आणि राहील.राहील साहेब नास्तिक आहेत मग मी आणि समा गेलो मंदिरात.मंदिर तर पूर्ण सोनेरी होता.मुंबई मध्ये अशी मंदिर दुर्मिळ .

 दुसरा दिवस .

सकाळी मी जरा लवकर उठलो.तयार झालो.नाश्ता करण्यासाठी डोसा प्लाझा मध्ये गेलो (मला नाव नीटसा आठवत नाही आहे).मस्त होता पण डोसा.त्या नंतर समाधान चा लोन चा काम करायला गेलो.त्या दिवशी सगळा प्रवास बस ने केला.मंग्लोरे मध्ये बस service मस्त आहे.प्रत्येक रंगाच्या बसेस.तिकीट पण मस्तच कागदाचा तुकडा आणि त्यावर काही तरी रागडलेल.समाधान थोडा वेळ कंपनी मध्ये गेला होता तो पर्यंत मी आणि सिद्धार्थ अजून एका मंदिरात जावून आलो.त्यादिवशीच मालवणला जायचा होता म्हणून मग लवकरच घरी आलो.त्या दिवशी ची खास गोष्ट म्हणजे चिकन "चिकन तीक्क्का हलाल " आणि नंतर "पब्बास " एक मस्त ice - cream parlore .त्यानंतर गाडी आली आणि आम्ही मालवण प्रवासाला लागलो.
समाधानचे सगळेच मित्र मला ओळखतात.इन्फोसिस  वाले नवीन होते.विजय एकदा भेटला होता मुंबई मध्ये पण तो वर वर ........
पण त्यानंतर मात्र गपांचा फड रंगला आणि मी हि त्यांचातलाच एक होवून बसलो.साम्याचे मित्र मस्त आहेत.


तिसरा दिवस


आम्ही पणजी ला पोहचलो.आता पणजी तून समा organizer  आणि विजय कोरपे lead  करणार होता.तिकडून मग मालवणची बस पकडली.अभिनंदन साहेब मग २ नो गेले आणि गाडी आम्हाला थांबवावी लागली विनाणती करून.अभय ला घाल घाल शिव्या घातल्या.लाल डबा खालीच होता पण तरी आम्ही मागची जागा पकडली.भंकस चालू झाली.अमोल साहेब मात्र फोने वर कोणाला तरी काही सांगत होते.त्याला पण थोड्या शिव्या पडल्या थोड्या सगळ्यांकडून.त्यात काय कमी होती म्हणून एक फिरंगी पण चढला तो पण मालवण ला चालला होता.त्याला पता सांगितला आणि विजय आणि समा त्याचा डोकं खात बसले.बर तो एकता कुठे निघाला होता काय माहित.त्यात पण काय कमी होती म्हणून हा अभया पण कान चावायला गेला त्याचे.आम्ही मागेच होतो मजा बघत.दोन तासांनी कुडाळ ला पोहचलो.आमची गाडी वाट पाहत बाहेरच उभी होती.ती पकडून मग मालवण गाठला.विजय साहेब थोडे कॉंफुस झाले पण पठ्याने घर शोधला.



घर काय वाडाच तो आणि घराचे लोक पण देव मानसं.नाही तर एवढ्या लोकांना कोण देयील राहायला.फ्रेश झालो आणि मग मोहिमे वर निघालो.


१) सिंधुदुर्ग


सिंधुदुर्ग ला आलो आणि सगळ्यान स्नोर्ण्क्लिंग करायची हौसा झाली.शेवटी हो नाही करता करता ठरला कि स्नोर्क्लिंग नाही तर स्क्क़ुब डायविंग करायची.१००० रुपरायाला  फोडणी प्रत्यकी.विजय साहेब थोडे नाराज दिसले कारण video निघणार नव्हता.

स्कूबाला एवढी गर्दी पाहून मग आधी गड फिरायचं ठरलं.

सिंदुदुर्ग बदल थोडसं

सिंधुदुर्ग म्हणजे अठरा टोपकरांच्या ऊरावर शिवप्रभूनी उभारलेला एक बळकट जलदुर्ग आहे.मालवण 


नजीक असणारे कुरटे नावाचे हे बेट तटबंदी घालून बंदिस्त केले आहे.आरमार पावसाळ्यात वसवण्यासाठी 


उत्तम बंदराचा आणि जंजिर्याचा आसरा लागतो.गोव्याच्या पोर्तुगीजांनी शह देण्यासाठी या दुर्गाची रचना 


केली गेली.


सिंधुदुर्गाच प्रवेशद्वार जीभीचे आहे.त्यातून आत आल्यावर उजवीकडे वळून पायर्यांवरून फांजीवर गेल्यास 


दोन घुमट्या आहेत.तेथील दोन घूमट्यात चुन्यात हातापायांचे ठसे आहेत.ते 'तीर्थरूप कैलासवासीमहाराज 


राजश्री छत्रपती' यांच्या हातापायांचे आहेत,असे इ.स.१७६२ मध्ये कोल्हापूरच्या जिजाबाई यांनी सिंधुदुर्गचा 


किल्लेदार येसाजी शिंदे याला पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे.


तटबंदीवरून आपल्याला गडाची प्रदक्षिणा पूर्ण करता येते.प्रवेशद्वारातून पुढे गेल्यास डाव्या हाताला एक 


आगळेवेगळे नारळाचे झाड आहे.त्या झाडाला दोन फांद्या आहेत आणि दोन्ही फांद्यांना नारळ लागले 


आहेत.तेथून पुढे गेल्यास शिवराजेश्वर मंदिर आहे.हे शिवाजीमहाराजांचे मंदिर त्यांचे पुत्र राजाराम महाराज


 यांनी बांधलेले आहे.आत शिवाजीमहाराजांची मूर्ती आहे.


दुर्गावर गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत.दहिबाव,दुधबाव,साखरबाव अशी त्यांची नवे 


आहेत.कोल्हापूरच्या छत्रपतीकडे या दुर्गाचा ताबा आहे.काही काळ चाच्यांनी हा दुर्ग ताब्यात घेतला 


होता.इंग्रजांनी चाच्यांकडून हा दुर्ग जिंकून त्याचे नाव ठेवले 'फोर्ट ऑगस्टस'


सिंधुदुर्गाचे एक मोठे वैशिष्ट्य आहे.त्याच्या तटबंदी चा परीघ ५-६ किलोमीटर तरी आहे.त्या तटबंदी वर 


जाण्यासाठी ४५ जिने बांधलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तटबंदीतच ४० शौचकुपे 


आहेत.इतक्या मोठ्या संखेने शौचकुपे असल्याचे इतर दुर्गात आढळत नाही.मळाचा कोणताही त्रास दुर्गात 


होत नाही.दुर्गाचे क्षेत्रफळ २० हेक्टर असावे.आत सुमारे अडीच-तीन हजार लोक दुर्ग लढवण्यास असताना 


स्वच्छतेची इतकी उत्कृष्ट व्यवस्था करणाऱ्या त्या स्थापतीचे कौतुक करावयास हवे.


सिंधुदुर्गाची हि रचना अभ्यास करण्यासारखी आहे.सध्या दुर्गाला ४० ठिकाणी भगदाडे पडली आहेत.त्यातून


 सागराचे पाणी आत येते.इथे समुद्रात डॉल्फिन्स हि आहेत.सिंधुदुर्गाची वैशिष्ट्य पाहण्याची सहल 


अभ्यासपूर्णठरेल.


एक ग्रुप फोटो 

गड फिरल्यावर स्कूबा ड्यिंग झाली.विजय ला कोणी तरी म्हणाला कि मी फोटो पाठवतो पण ते अजून आले नाहीत.त्याला त्या लोकांनी चू ... बनवला.


२) तर्करली 

कोकणातला एक सुंदर समुद्र किनारा.इथे आम्ही जवळ जवळ ५ दरम्यान पहोच्लो.मग काय मनसोक्त डुंबून घेतला.थोडा फोटो शूट केला.इकडे तिकडे झलक मारली.३१स्त होता त्यामुळे जरा जास्त लोक होती.२०११ ला गुड बये करायला एक उत्तम जागा.


३) साळसकर गणपती.


जबर लक म्हणजे ३१स्त ला आरती मिळाली आम्हाला गणपतीची.


आता मात्र थकून सर्वाना भूक लागली.काही जन म्हणाले कि पार्ट्य बघायला जावू beach  पार्टी .मला नाव माहित नाही पण सांगून सुधा उपयोग नाही कारण अशी पार्टी नव्हती पिणार नाही हे सगळ्यांनी ठरवला होत.मग खाण्यावर तुटून पडायचा ठरलं.एक प्रोब्लेम होत अर्ध्या पेक्षा जास्त लोक veggii  ( घास पूस खाणारे)
एक हॉटेलात तर पाणी पिवून बाहेर आलो कारण वेज मध्ये काही नव्हत.मग  ड्रावर मित्राने एक खानावळीत गाडी न्हेली.मग काय आम्ही दिली नोन वेज ओर्डर.वेज मध्ये पाहतो तर कसली तरी भाजी होती.मग आम्ही आमच्या वेज मित्रांना विसरून जेवेनावर तव मारला.वैतागलेले वेज वाले दुसर्या हॉटेलात गेले.तिथे बहुदा वेज मिळाला असेल.


आम्ही जेवून मग दुसऱ्या दिवसाची प्लान्निंग करू लागलो.विजयदुर्गा पाहायचा बेत त्या दिवशीच कॅन्सिल झाला.मग गाडी सोडून दयाच ठरलं.सगळे घरी आलो happy  new  year  करून झोपलो.


चौथा दिवस : -


सकाळी उठून मग वेंगुर्ला beach  जो अगदी घराच्या मागेच होत.मग काय झालो सुरु.काय काय खेळलो (काबाडी,खोखो,क्रिकेट,शिवाजी शिवाजी).साधारण १२ च्या दरम्यान परतीच्या प्रवासाला लागलो.


एक फमिली फोटो ...


छोटू चा बरेच फोटो काढले.ते तसे मी न  विसरता पढवले पण होते दादाला.


परतीच्या वेळी मग पुढच्या प्लान्निंग ची सुरवात झाली.एक अनिखा मित्र परिवार आता हे सगळे FB  वर आहेत.दांडेकर साहेबांनी तर ग्रुप पण बनवला आहे.






समाप्त


राहुल घोलप.


















Sunday, April 1, 2012

एक बाकी एकाकी

एक बाकी एकाकी, एक अंत एकांत l
एक अडके एकात, एक एकटया जगात ll
एक खिडकी एक वारा, एक चन्द्र एक तारा l
एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच...ll

Monday, March 26, 2012

एकटेपणाचं विष

हवीहवीशी माणसं
नकळत दुर निघुन जातात
त्यांच्याशिवाय जगण्याचं
शिकवुन जातात..
आपण बसतो...उगाच
रडत...त्या विरहात...
ते मात्र आपल्या जगण्यावर
आस लावुन जातात.
जे आपल्यापासुन दुर गेलेत...
ते कधी आपले नव्हतेच..
जे आहेत सोबत...
तेच आपले हक्काचे..
तेच देतील साथ
शेवटच्या क्षणापर्यंत.
जिवाचे जिवलग
मोठ्या नशीबाने मिळतात...
समुद्राचे मौसमी वारे...
फक्त हंगामी असतात..
ते येतात नी निघुनही जातात...
पण जे तुझे हक्काचेअसतात...
ते वादळातही घट्ट धरुन राहातात.
चुक कोणाची..
समजुत कोण घालणार..
सगळेच ताठ मानेचे..
कोण मान झुकवणार.
रथचक्र..आपण...
सारथीही आपणच...
वेगही आपलाच..
अन बंध ही आपलेच..
सारे मनाचे खेळ.
प्रत्येकाचा त्या आयुष्याच्या
रंगमंचावरचा रोल ठरलेला आहे...
तेवढी भुमीका वटल्याशिवाय
जाता येत नाही..
ती भुमीका संपली..की तिथे
राहाताही येत नाही...
बस...हेच सत्य आहे...
शल्य प्रत्येकानेच उरी बाळगलेलं..
एकटेपणाचं विष...ज्याने त्याने...
कोळुन प्यालेलं...
असच एकटेपणी जगाताना...
कधी ना कधी...
ज्याचं त्याचं मन...
एकांतात कोसळलेलं
 

Wednesday, March 7, 2012

होय, मी मराठी आहे…


होय, मी मराठी आहे…

१.कारण आजही आमच्या धमन्यांत महाराजांचे रक्त खेळते.
२.कारण भारतीय राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे याचा आम्हाला अभिमान आहे.

३.कारण खोखो, कबड्डी हे एकमेकांना आयुष्यातून ‘उठवायचे‘ आणि एकमेकांच्या ‘तंगड्या‘ ओढायचे मराठी खेळ आम्हाला अतिप्रिय आहेत.
४.कारण भारतातल्या सर्वश्रेष्ठ अशा फुले-शाहू-आंबेडकर, कर्वे, प्रबोधनकार, गाडगेमहाराज या समाजसुधारकांचा वारसा आम्हाला आहे.

५. कारण सी डी देशमुखांनी नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकल्याचा इतिहास आम्हाला तोंडपाठ आहे.
६. कारण कुणीही कितीही म्हटले तरी राजमुळे भय्या लोक ‘चड्डी’ मध्ये राहायला लागले हे आम्हाला पटते.
७. कारण बेळगावला कन्नडिगांनी धिंगाणा घातला तरी आम्ही इथे त्यांना हाणत नाही.
८. कारण कविता राऊतपासून वीरधवल खाडेपर्यंत आम्हाला सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे.
९. कारण अटकेपार (हे आता कुठे आहे हे माहीत नसले तरी ) झेंडे रोवल्याचा आम्हाला अभिमान आहे.
१०. कारण मराठी नीट लिहिता येत नसली तरी मराठी पंचलाईन असलेले टी-शर्ट घालून अभिमानाने फिरतो.

११. कारण कितीही अशक्य वाटत असले तरी कधीतरी पवारकाका पंतप्रधान बनणार असे आम्हाला उगीचच  वाटते.
१२. कारण आम्ही आमची स्वत:ची बायको सोडली तर कुणाच्या बापाला घाबरत नाही.
१३. कारण आम्ही आता हिंदी वृत्तवाहिन्या फारशा बघत नाही. राजच्या वेळी त्यांनी दाखवलेला पक्षपातीपणा आणि माजोरडेपणा आम्ही अजून विसरलेलो नाही.
१४. कारण कुणीही जिंकले नाही तरी आयपीएलमध्ये आमचे दोन संघ असल्याचे आम्हाला समाधान वाटते.
१५. कारण राखी सावंत मराठी आहे याचा आम्हाला प्रचंड राग येतो.

१६. कारण ‘मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला’ असे भिक्कार वाक्य ठाकरेआजोबा लिहिणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे.
१७. कारण आम्हाला सह्याद्रीच्या कड्याकपारीत ट्रेकिंगला जायला आवडते.
१८. कारण पाऊस आला की आम्ही ‘गारवा’च ऐकतो.

१९. कारण सचिन ‘मलिंगा’चा भक्त असल्याची आम्हाला लाज वाटते.
२०. कारण अबू असीम आझमीला बघितले की आमच्या तोंडात शिव्या येतात.
२१. कारण मराठी साहित्य संमेलनात होणारी भांडणे बघून काय होणार या हरामखोरांचे (मराठीचे नव्हे ) असा आम्ही विचार करतो.
२२. कारण बॉम्बेला मुंबई म्हणायला आम्हाला आवडते.
२३. कारण ‘अय्या, माधुरी किती छान मराठी बोलते’ हे वाक्य आम्हाला माधुरीपेक्षा जास्त सुंदर वाटते.

२४. कारण आम्हाला फुकाची संस्कृती शिकवणारे आमचे मराठी कलाकारसुद्धा तर्राट होऊन धिंगाणा घालू शकतात हे आम्ही बघितलेले आहे.
२५. कारण संदीप वासलेकर हे कोण आहेत हे आम्हाला अजून माहित नाही.
२६. कारण पु. ल. देशपांडे हे एकच श्रेष्ठ लेखक होऊन गेले असे आम्ही मानतो.
२७. कारण ‘आयचा घो’  या वाक्यप्रचाराला आम्ही शिवी मानत नाही.
२८. कारण इकडे डरकाळ्या फोडणारे हिंदीभाषिक दक्षिणेत सुतासारखे सरळ कसे असतात हे आम्हाला अजून कळत नाही.
२९. कारण ‘महागुरू’ कितीही डोक्यात गेला तरी आम्ही ‘एकापेक्षा एक’ बघतो.
३०. कारण आम्हाला हिंदी चित्रपट पुरस्कार सोहळ्यापेक्षा ‘झी गौरव’ सोहळा आवडतो.
३१. कारण सारेगामा कार्यक्रम कितीही ताणला तरी आम्ही तो बघतो.
३२. कारण आमचा मकरंद अनासपुरे भविष्यात रजनीकांतला टक्कर देईल असे आम्हाला वाटते.
३३. कारण हिंदी चित्रपटात कितीही दुय्यम भूमिका केल्या तरी मराठी कलाकारच श्रेष्ठ असतात हेच सत्य आहे असे आम्ही मानतो.

३४. कारण आम्हाला मराठीचे संवर्धन करा असे बेंबीच्या देठापासून बोंबलणाऱ्या सगळ्या साहित्यिकांची सगळीच पोरे अमेरिकेत कशी, असा प्रश्न आम्हाला पडतो.
३५. कारण आमच्या सचिनला कुणी शिव्या घातल्या की आम्ही त्याची आईबहीण काढतो.
३६. कारण पानिपतची लढाई आजपण आम्हाला स्फुरण चढवते.
३७. कारण आमचा लाडका लक्ष्या गेलाय यावर आमचा अजून विश्वास बसत नाही.
३८. कारण ‘शाळा’ पुस्तक वाचले की आम्ही शाळेत केलेल्या गमतीजमतीत हरवून जातो.
३९. कारण ‘शिक्षणाच्या आयचा घो’ हा चित्रपट ‘थ्री इडीयट’पेक्षा चांगला चित्रपट आहे असे आमचे मत आहे.
४०. कारण आम्हाला ऊसाचा रस कोल्ड्रिंकपेक्षा जास्त भावतो.
४१. कारण राजकारणात कुठलाही भूकंप झाला की यामागे पवारकाकांचा हात आहे असे आम्हाला वाटते.
४२. कारण बाबासाहेब पुरंदरे या माणसाला शिवाजी महाराजांपेक्षा जास्त इतिहास माहीत आहे असे आम्हाला उगीच वाटते.
४३. कारण ‘झलक दिखलाजा, एक बार आजा आजा‘ हे गाणे शेतकरी आणि पाऊस या दोघांमधला संवाद आहे असे आम्ही समजतो.
४४. कारण कुठल्या शहरातली मिसळ चांगली यावर आम्ही कितीही वाद घातले तरी मिसळ ही सर्वश्रेष्ठ आहे यावर आमचे एकमत आहे.
४५. कारण आम्ही आमच्या पोरांना इंग्रजी माध्यमात नक्की कशासाठी शिकवतो याचे कारण आम्हाला अजून सापडलेले नाही.
४६. कारण स्वस्थ बसवत नाही म्हणून कशाला तरी उगीच कारण नसताना दुसऱ्या मराठी माणसाची खोडी काढायची ही आमची जुनी सवय आहे.
४७. कारण फुटकळ मराठी चित्रपट बघण्यापेक्षा ‘दर्जेदार’ नाटके बघायला जास्त आवडते.
४८. कारण आम्ही ‘बसलो’ की आमच्यावर अन्याय कसा होतो याचाच पाढा वाचत बसतो.
४९. कारण आता महाराष्ट्राचा बिहार होतोय आणि बिहारचा महाराष्ट्र होतोय असे आम्हाला वाटायला लागलंय.
५०. कारण आम्हाला शरम वाटते की आमच्या राज्यकर्त्यांना (महाराष्ट्राला ५१ वर्षे झाली तरी) अजून विकासाचे राजकारण करावे याची अक्कल आलेली नाही.

५१. कारण महाराष्ट्र दिन आम्ही पिकनिकमध्ये ‘सत्कारणी’ घालवतो.

जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी.......

जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले

आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये

कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला

बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी

मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले

थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले

ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही

त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला

लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला

जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली.

Tuesday, March 6, 2012

एकदा मेल्यावरी मी परतुनी आलो घरी....

एकदा मेल्यावरी मी परतुनी आलो घरी
तेच होते दार आणि तीच होती ओसरी ।

होती तिथे तसबीर माझी भिंतीवरी टांगली
खूप होती धूळ आणि कसर होती लागली ।

द्रवलो तिला पाहून, होती शेवटी माझीच ती
दिसली मला पण आज माझ्या प्रेताहुनी निस्तेज ती ।

बोलली की हीच का, माझ्यावरी माया तुझी
गेलास ना टाकून, होती प्रत्यक्ष जी छाया तुझी ।

बोलली हे ही तुला का सांगावया लागते
मेल्यावरी जगण्यास वेड्या, खूप कीर्ति लागते ।

होऊनी स्वार्थांध नुसता, कैसातरी जगलास तू
आहेस का, केला कुठे, जगण्याविना पुरुषार्थ तू? ।

समजली ना, आता तरी, आपुली स्वत:ची पायरी
समजले ना काय मिळते, नुसती करूनी शायरी? ।

ओशाळलो ऐकून, नेली तसबीर मी ती उचलुनी
सांगतो ह्याची तिथे, चर्चाही ना केली कुणी

कफ़न माझे दूर करुनी पाहिले मी बाजूला

कफ़न माझे दूर करुनी
पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात नाही पाहिला
बघुनी हे माझेच आसू, थांबले गालावारी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी
मरता मी वाटले, शोकार्णवी बुडतील ते
श्रद्धांजली तर जागोजागी, वाटले देतील ते
थोडे जरी का दुःख माझे, असते कुणाला वाटले
जळण्यात सरणात मजला, काहीच नसते वाटले
ऐसे जरी संतोष तो, मानुला इतुकाच मी
कळलेच ना कोणा कसा, कफणात रडलो मी
त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकिती प्रेतास का ते, तेंव्हा कुठे कळले मला
लाभला एकांत जेव्हां, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रुंचा मला
हाय....ती सारी चिताही,गेली विझोनी शेवटी
जळण्यातही सरणात पुरते, भाग्य नव्हते शेवटी
जळण्यातही सरणात पुरते, भाग्य नव्हते शेवटी...